Farmer's day
#Agriculture_farmer_image
*आज राष्ट्रीय शेतकरी दिन... इडा-पीडा टळो बळीचं राज्य येवो!*
आज शेतकरी अत्यंत केविलवाणा झालेला आहे. शेतकऱ्याला सन्मानाने बळीराजा म्हटले जाते; मात्र प्रत्यक्षात हा राजा अतिशय दिनदुबळा झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे. कर्जबाजारीपणा, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आर्थिक विवंचना ह्या आपत्तींचा बळी हा बळीराजा ठरलेला आहे. प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्याप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे उचित आणि अत्यावश्यक गरजेचे आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिक विवंचनेतून हा शेतकरी जात आहे. कोणत्याही समस्येने जरा ही बळीराजांना-शेतकर्यांना कोणी ग्रासले असेल तर याला आपला मदतीचा हात नक्की मिळाला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकांनी याबाबत आपला मदतीचा हात समोर केला पाहिजे हि सध्याची परिस्थिती झाली आहे. सगळ्यांनी अवती-भवती असणाऱ्या शेतकर्यांना त्यांचा स्वाभिमान जराही न दुखावता, हवी तेवढीच आणि तितकीच मदत अगदी स्वेच्छेने केली पाहिजे.
शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व शासकीय योजना; सोयी-सवलती प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचती पाहिजे. अनेक शेतकरी यांचे शिक्षण अपूर्ण असल्याने त्यांना शासनाच्या योजनांची माहिती होत नाही किंवा शासनाच्या योजनांचा लाभ कसा घायचा हे त्यांना माहिती होत नाही. समाजात कितीतरी शेतकरी डोळसपणे आधुनिक आणि पारंपारिक शेती यांचा योग्य तो समन्वय साधून आणि योग्य तो शेतीपूरक जोड-धंदा कसा करायचा याबाबत त्यांना माहिती आपण देऊ शकतो. यशस्वी शेतकरी म्हणून अत्यंत सुखी-समाधानी आणि तृप्त जीवन जगण्याचा धीर आपण त्यांब्ना देऊ शकतो. त्यामुळे या संदर्भात आपल्याला या व्याकूळ झालेल्या शेतकऱ्यांना या विषयी माहिती देऊन शक्य तेवढी मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे.
#aamhi_shetkari
#jagacha_poshinda
#baliraja

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा